
मुंबई – श्री तुळजाभवानी मंदिर अपहाराच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला. त्यानुसार मंदिरात ८ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ९ मे २०२४ या दिवशी संबंधित १६ आरोपींवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट (दाखल) करण्याचा आदेश दिला आहे; मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले नसल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या संदर्भात गुन्हा नोंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्यावर ९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाचा गुन्हा नोंद करण्याचा निर्णय हा न्यायसंगत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी राज्य सरकार, अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. त्यात हिंदु जनजागृती समिती आणि श्री तुळजाभवानी देवस्थान यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
श्री तुळजाभवानी देवस्थानात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी ९ लिलावदार, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक आणि १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यासह तत्कालीन अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे नोंदवण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी अहवालाद्वारे महाराष्ट्र शासनाला केली आहे. त्याला ७ वर्षे उलटली, तरी अद्यापही दोषींवर कुठलीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषद न्यायालयात लढा देत आहे.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !