सिंधुदुर्गनगरी येथे ९ डिसेंबरला डाक अदालतीचे आयोजन
विशेषत: टपाल, स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यांविषयीच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील.
विशेषत: टपाल, स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यांविषयीच्या तक्रारी या डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील.
पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी महिला ग्राहकाची वाट पहात उभी रहाणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचच्या महिला विभागाने केले आहे.
मोपा विमानतळाकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने कह्यात घेतलेली भूमी परत करावी, अशी मागणी करत तुळसकरवाडी गावातील लोक मोठ्या संख्येने १ डिसेंबरला रस्त्यावर आले.
नालासोपारा (पूर्व) येथे ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती मिळावी, यासाठी राबिया अहमद रझा खान या महिलेने वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना महानगरपालिकेने ‘बीफ’ विक्रीसाठी अनुमती दिल्यास ‘मोठे आंदोलन छेडू’, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे.
पुणे आणि सांगली विभागात विक्रमी मतदान झाले !
मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेने अजानची सार्वजनिकरित्या स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून देत स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास विरोध दर्शवला, असे स्पष्टीकरण दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भाजप शासनाच्या काळात राज्यात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता आहे, असे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी अहवालात म्हटले होते.
८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.