
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – ८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. पहाटे ५ वाजता काकड आरती झाली. यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्री चरणावर षोडशोपचार महापूजा करण्यात आली. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.
सायंकाळी ६ नंतर दत्त मंदिर घाट परिसर शेकडो पणत्यांनी उजळून गेला. महिलांनी नदीपात्रात दीप सोडल्याने नदीपात्रही दिव्यांनी उजळून गेले. दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांची ‘थर्मल टेस्ट’, तसेच ‘सॅनिटायझेशन’ केले. मुख्य रांगेसमवेत मुखदर्शनाची सोय केली होती. भाविकांनी सामाजिक अंतर पाळत आणि ‘मास्क’ लावून रांगेने दर्शन घेतले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !