वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !

आज पेडणे तालुक्यातील वळपे येथे पौष शुक्ल पक्ष अष्टमी, कलियुग वर्ष ५१२२ या दिवशी श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा जत्रोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भक्तांच्या हाकेला धावून येणार्‍या या देवतांची माहिती पाहूया.

मी ४ ते ५ दिवसांत बरा होऊन घरी जाईन ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

माझे आरोग्य आता सुधारत आहे.मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

चाफळ (जिल्हा सातारा) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.

चिखली (जिल्हा बुलढाणा) मतदारसंघात ब्राह्मण समाजावर कधीही अन्याय होणार नाही ! – आमदार श्‍वेता महाल्ले 

ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्‍वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सौ. श्‍वेता महाल्ले यांनी केले.

पुण्यातील कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक

पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्‍याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.

किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.

मुंबईत नवजात बालकांची विक्री-खरेदी करणारी टोळी अटकेत; आधुनिक वैद्यासह परिचरिकांना अटक

गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणार्‍या टोळीला सापळा रचून तीन जणांना कह्यात घेऊन अटक केली .

सरपंचपदाचे आरक्षण एक मासात काढणार – ग्रामविकास मंत्री

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे – मंत्री हसन मुश्रीफ

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार !  विश्‍वेश परब, युवा आंदोलक, मेळावली

भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्‍वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर ते बोलत होते.

७० पैकी ४५ ग्रामपंचायती भाजपकडे, तर शिवसेनेची २१ ग्रामपंचायतींवर सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १८ जानेवारीला घोषित झाला. या वेळी ७० पैकी ४५ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला २१ ग्रामपंचायतींत यश मिळाले.