बलात्काराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुलींना दिलेल्या सल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !

‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ अश्‍लीलतेचा व्यापार अन् अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी करतात प्रवृत्त !

भारतातून नाही, तर अश्‍लीलतेचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील एक राज्य सरकारनेच आता अशा सामाजिक माध्यमांवर गुन्हा नोंद केला आहे. यातून या माध्यमांच्या अतिरेकी वापरावर आता भारताने योग्य पायबंद घालणे, हेच हितावह ठरणार आहे !

अल्पवयीन मुलाची हत्या करणारे दोघे अटकेत !

तरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि क्रूरता रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता !

मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता !

बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता.

सौंदत्ती यात्रेसाठी ‘एस्.टी.’चा ‘खोळंबा आकार’ नाममात्र २० रुपये आकारण्यात येणार ! – राजेश क्षीरसागर

कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून २०० हून अधिक एस्.टी. गाड्यांतून भाविक जातात. या यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने ‘खोळंबा आकार’ प्रतिघंटा ९८ रुपयांवरून नाममात्र २० रुपये करण्यात आला आहे.

वागातोर  येथे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !

नागरिकांना तापदायक ठरणार्‍या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !

बाळ्ळी येथे ‘बालरथ’ उलटला : २४ विद्यार्थी घायाळ

कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Garba UNESCO : गुजरातच्या गरब्याला ‘युनेस्को’च्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत स्थान !

गुजरातमधील जगप्रसिद्ध धार्मिक नृत्य असलेल्या गरब्याला संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ संस्थेने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ सूचीत समाविष्ट केले आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या निर्णयाची माहिती त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून दिली.

महाराष्ट्रात ४ वर्षांत भटकी कुत्री चावून १०० जणांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू न शकणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

Cyclone Michaung: चेन्नई शहराला ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा मोठा फटका : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या  चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.