मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना चुकीच्या आकाराचे, फाटलेले, अशोक चक्र मध्यभागी नसलेले राष्ट्रध्वज वितरित !

ध्वज वितरित करण्यापूर्वी ते योग्य आहेत का ? हे प्रशासनातील कुणी पडताळत नाही का ?

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनास निवेदने

हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून प्रश्नमंजुषा, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके-फ्लेक्स, ध्वनीचित्रफीती, समाजमाध्यमे या माध्यमांतून, तसेच रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करणे यांद्वारे जनजागृती करत आहे.

गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.

सातार्‍यात फडकणार ७५ फूट उंच राष्ट्रध्वज

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे.

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ आणि ‘लव्ह जिहादपासून हिंदु भगिनींचे रक्षण’ यांविषयी चळवळ राबवण्याचा उपस्थितांचा निर्धार

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी येथील जिज्ञासूंची एक ‘ऑनलाईन’ बैठक २० जुलै या दिवशी पार पडली.

केंद्राने ध्वजसंहितेत केलेल्या पालटानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार !

पॉलिस्टरपासून सिद्ध केलेल्या, तसेच यंत्रावर सिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला कोणत्याही वेळी वंदन करता येईल.

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.