झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !

हत्या करणार्‍यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !

न्यायव्यवस्थेतील प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता ! – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्र सरकारवर टीका करणारी वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले की, देशातील राजकीय क्षेत्रात नैतिकतेची होत असलेली घसरण चिंताजनक आहे.

मारहाण करणार्‍या २ धर्मांधांना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची शिक्षा !

ही घटना १५ सप्टेंबर २०१६ या दिवशी घडली होती. या प्रकरणी न्यायाधिशांनी ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपिलात आरोपींना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची आणि प्रत्येकी ७ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा १३ जुलै या दिवशी न्यायाधिशांनी केली.

कुख्यात गुंड आबू सालेम याला २५ वर्षांच्या शिक्षेनंतर सोडावे लागेल ! – सर्वोच्च न्यायालय

मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात कुख्यात गुंड आबू सालेम याला दोषी ठरवण्यात आले आहे. कारागृहाची शिक्षा भोगल्यानंतर पोर्तुगालला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारला त्याला मुक्त करावे लागेल’, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

भारतीय हिंदु नागरिकाची पाकिस्तानी सहकार्‍याकडून सौदी अरेबियामध्ये हत्या

उत्तरप्रदेशातील जंग बहादुर यादव नोकरी निमित्त सौदी अरेबियाला गेले असता तेथे त्यांच्या पाकिस्तानी सहकार्‍याने त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या का आणि कशी करण्यात आली, याची विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील बाँबस्फोटांच्या प्रकरणी ५ जिहादी आतंकवाद्यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशा आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

पाकिस्तानने शिक्षा भोगलेल्या ५३६ भारतीय मासेमारांची सुटका करावी ! –  भारत

पाकिस्तानने अटक केलेल्या ५३६ भारतीय मासेमार आणि अन्य ३ बंदीवान यांची सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे. या बंदीवानांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे.

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस आणि नन सेफी यांना जामीन संमत

थिरूवनंतपूरम् येथील नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पाद्री थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याकडून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

देशात कायदे आणि न्यायप्रणाली असतांना अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांना अशा धमक्या मान्य आहेत ?