संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

कर्नाटकमध्ये गोहत्याबंदी विधेयक संमत

काँग्रेसला गोमातेपेक्षा धर्मांधांच्या जिभेचे चोचले पुरवणे अधिक प्रिय आहे. त्यामुळे ती अशा कायद्याला विरोध करते. काँग्रेसने धर्मांधांच्या लांगूलचालनापायी गेल्या ७४ वर्षांत सत्तेत असतांना राज्यांत किंवा केंद्रात गोहत्याबंदी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

कर्नाटकच्या विधानसभेत गोहत्येवर बंदी आणणारे विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला.

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलांचा आत्मसन्मान महत्त्वाचा !

लव्ह जिहाद्यांच्या कारस्थानांना हिंदु युवती बळी पडू नयेत, धर्मांतरासाठी दाखवल्या जाणार्‍या आमिषाला बळी पडू नये, याकरता बालपणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण देणे, स्वधर्माविषयी अभिमान वाढेल, असे धर्मशिक्षण देणे, आयुष्यातील कठीण प्रसंगांत स्थिर राहून धर्माची कास धरून वाट काढणे, हेच आता हिंदु समाजाला शिकवायला हवे !

राज्यपालांची संमती मिळाल्याने उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू

केंद्र सरकारनेच असा कायदा संपूर्ण देशासाठी करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !

संस्कृत हीच संस्कृती !

इंग्रजी बोलणार्‍यांच्या देशात कार्यक्रमांचा प्रारंभ संस्कृत भाषेतून होत आहे आणि ती पाश्‍चात्त्य भाषांना वरचढ ठरत आहे. ‘भाषा मरता, देश आणि संस्कृतीही मरते, तर भाषा जगता देश आणि संस्कृती यांना ऊर्जितावस्था येते’, असे म्हटले जाते. जगभरात संस्कृतचे केले जाणारे गुणगान ही आगामी हिंदु राष्ट्राची नांदीच ठरणार आहे, यात शंकाच नाही.

संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.