केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला आव्हान देणारी ३ कृषी विधेयके विधानसभेत सादर !

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. आता या विधेयकामध्ये काही महत्त्वाचे पालट करून राज्य सरकारने नवीन कृषी विधेयक सभागृहात सादर केले आहे.

बोगस खतांची विक्री करणार्‍या किती आस्थापनांवर कारवाई केली, याचा खुलासा सरकारने करावा ! – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

विधान परिषद कामकाज, बोगस खतांची विक्री करणार्‍या ४२ आस्थापनांची नावे समोर आली आहेत. ‘या बोगस खतांची विक्री करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करावी’, या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली;

भाजपच्या प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक आणि माईक जप्त करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा आदेश !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पहिल्या दिवशी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यावर बसून प्रतिविधानसभा घेतल्याचे पडसाद विधानसभेत उमटले.

अनेक विकास महामंडळांनी २० वर्षांपूर्वींचे वार्षिक अहवाल २०२१ मध्ये पावसाळी अधिवेशनात केले सादर !

वार्षिक अहवाल वेळेत सादर न करणार्‍या मंडळांवर काय कारवाई करणार ?, ते जनतेला कळायला हवे !

विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे ! – मुख्यमंत्री

विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे घडले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. विधीमंडळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार दिला जातो;

भाजप आमदारांचे निलंबन केले हा शिस्तीचाच भाग ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारची एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आमच्यावर ‘बॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो बॉम्ब त्यांच्यावरच फुटला.’’

खासदारांचे दूरभाष ध्वनीमुद्रित करण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

माझे दूरभाष ध्वनीमुद्रित करून मला ‘अमजद खान’ नाव ठेवले ! – नाना पटोले यांचा सभागृहात गंभीर आरोप ! श्री. सागर चोपदार, मुंबई मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी दूरभाष ध्वनीमुद्रित केल्याविषयी गंभीर आरोप केले. ‘वर्ष २०१६-१७ मध्ये माझा दूरभाष ध्वनीमुद्रित करण्यात आला. माझे नाव ‘अमजद खान’, असे ठेवण्यात … Read more

केंद्रीय संस्था सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याने त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत असतील, तर त्याचाही परामर्श, काळजी आणि त्याविषयी चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी,..

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.

विधानसभेत ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढले !

विधानसभेत आमदार रवी राणा यांनी शेतकर्‍यांच्या सूत्रावरून गोंधळ घालत ६ जुलै या दिवशी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेेश दिले.