श्रीरामाचे दर्शन घेण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्‍येला जाणार !

श्रीरामाने जीवनभर सत्‍य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी संदेशात म्‍हटले आहे.

१ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होण्‍याची शक्‍यता

वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्‍या राज्‍यस्‍तरीय समन्‍वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्‍तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र दंड वसूल

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र ९८४ रुपये दंड वसूल करण्‍यात आल्‍याची माहिती एन्.एम्.एम्.टी.चे व्‍यवस्‍थापक तथा उपायुक्‍त योगेश कडूसकर यांनी दिली.

नवी मुंबईत श्री रामनवमी उत्‍सव उत्‍साहात साजरा !

नवी मुंबईत ठिकठिकाणी श्री रामनवमी उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. तुर्भे गाव येथील संत श्री रामतनुमाता मंदिर येथे विश्‍वनाथ कृष्‍णाजी सामंत ट्रस्‍टच्‍या वतीने श्री रामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात आला.

महामार्गावर ‘चिपलुन’, ‘पेन’ असे अशुद्ध भाषेत गावांच्या नावांचे फलक !

फलकांवर शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिली जात आहेत. चिपळूणचे ‘चिपलुन’ किंवा पेणचे ‘पेन’ असे नामफलक काही ठिकाणी आहेत.

पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.

जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास का होतो ? – संदीप देशपांडे, मनसे

हिंदू रस्त्यावर उतरले की, सर्वांना त्रास होतो आणि मुख्यत्वे साम्यवाद्यांना त्रास होतो. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आणि कलम ३७० हटवल्यानंतर शाहीनबागमध्ये मुसलमान १०० दिवसांहून अधिक काळ बसून राहिले, तेव्हा न्यायालयाला हे चुकीचे होत आहे, असे वाटले नाही का ?

पनवेलजवळील बंबईपाडा येथे बांधकाम व्‍यावसायिक महिलेवर गोळीबार

पनवेलजवळील बंबईपाडा येथे एका बांधकाम व्‍यावसायिक  महिलेवर (वय वर्षे ३०) गोळीबार झाल्‍याची घटना २८ मार्चच्‍या सायंकाळी घडली. व्‍यवसायाच्‍या वादातून ही घटना घडल्‍याचे म्‍हटले जात आहे.

राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा  !

काही दिवसांपूर्वी येथून मोठ्या दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या संशयितांना ग्रामस्‍थांनी पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणाहून कोणते राष्‍ट्र आणि समाज विघातक कृत्‍य घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने या दर्ग्‍यासह येथील सर्व अनधिकृत बांधकाम त्‍वरित हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे