नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे.

फेरीवाल्यांना पूर्वी घोषित केलेले आणि अद्याप न मिळालेले आर्थिक साहाय्य तात्काळ द्यावे !

गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती.

लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

भाजपचे खासदार शर्मा यांची देहलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.

थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजप सत्तेत आल्यापासून पोलीस चकमकीत मारले गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान !’  

जर ओवैसी यांनी दिलेली आकडेवारी खरी असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान गुन्हेगारी कृत्यात सहभागी होते, हेच सिद्ध होते; कारण आतापर्यंत या चकमकीवरून पोलिसांवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही कि गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची घरपट्टी बुडवली ! – धनंजय महाडिक यांचा आरोप

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिळकतींची वर्ष १९९७ पासून घरपट्टी थकित असून आजपर्यंत दंडाच्या व्यतिरिक्त ९१ लाख ६३ सहस्र २५२ रुपये इतकी रक्कम बुडवली आहे, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ६ मार्च या दिवशी पत्रकार बैठकीत केला.

सरकारी कर्मचारी ऐकत नसतील, तर त्यांना बांबूचे फटके मारा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा जनतेला सल्ला

हे म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेती ही शाश्‍वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकर्‍यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.