कोकणातील युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेती ही शाश्‍वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकर्‍यांनी केवळ दोन घास दिले नाहीत, तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.

सातारा आणि कराड यांच्या पथकरमुक्तीसाठी खासदारांनी निर्णय घ्यावा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद ! – नरेंद्र पाटील

श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे आध्यात्मिक सेवेचा वसा लाभलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून महेश इंगळे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे नरेंद्र पाटील म्हणाले.

जगात जेथे हिंदू नाहीत, अशा ठिकाणी मुसलमान एकमेकांशी लढून संपत आहेत ! – काँग्रेसी नेते गुलाम नबी आझाद

गुलाम नबी यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?

शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार ! – खासदार उदयनराजे भोसले

सातारावासीय रसिकांच्या हक्काचे असलेले शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार असल्याचे आश्‍वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

उत्तरप्रदेशातून आलेली ‘उस्मानी’ घाण तिथेच थांबवली असती, तर असे घडले नसते ! – संजय राऊत

३० जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी हिंदुद्वेषी शरजील उस्मानीची घाण उत्तर प्रदेशमधून आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांना साहाय्य करावे, याचाही विचार करावा लागेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘छत्तीसगडमध्ये भाजपच्या खासदाराकडून माझ्या मृत्यूसाठी यज्ञ !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्‍वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !