विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो.

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सरस्वतीदेवीचा अपमान केल्याप्रकरणी यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र करणी सेनेकडून पोलिसात तक्रार

सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यास विरोध केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची, तसेच बौद्ध आणि हिंदु धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करून कवि यशवंत मनोहर यांना अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यात केली आहे.

पुरस्कार आणि तिरस्कार !

बौद्धिक क्षेत्रात वावरणार्‍यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !

नागपूर येथे कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर यांंनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे

मार्च मासाच्या अखेरीस नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संभाजीनगरमध्ये ८ जानेवारी या दिवशी केली.