मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी ! – खासदार संभाजीराजे भोसले

न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ? हे पहावे.

कोल्हापूर शहरात गारांचा वर्षाव

अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची बैठक घ्या ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण आणि नातेवाईक यांची आर्थिक लूट होत आहे.

कोल्हापुरातील एका केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी

कोल्हापुरात दोन दिवसांच्या लसीच्या तुटवड्यानंतर २६ एप्रिल या दिवशी अनेक केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कुंभार गल्ली (कोल्हापूर) येेथे भाजी विक्री करणार्‍या हिंदु शेतकर्‍यांना उद्दाम धर्मांधांकडून भाजी विक्रीस मज्जाव !

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्याने धर्मांध आज हिंदु शेतकर्‍यांना भाजी विक्री करण्यास मनाई करत आहेत. अशा घटना उद्या देशभर घडल्यास आश्‍चर्य वाटायला नका !

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) परिसरामध्ये पसरत चाललेल्या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा ! – करवीर शिवसेनेचे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवेदन

उंचगावमध्ये मलेरिया सदृश्य रुग्ण आणि तापाचे रुग्ण यांमध्ये वाढ होत असून याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा !

सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हुपरी येथील मुख्याधिकारी आणि पोलिसांच्या गोपनीय विभागाचे अधिकारी यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले.

आशा प्रवर्तकांचे प्रश्‍न न सुटल्यास आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अनेक ठिकाणी प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक काम करतात, तसेच त्या सुट्टीच्या दिवशीही काम करतात. इतके काम करूनही त्यांना त्याचा पुरेसा मोबदला देण्यात येत नाही.