
कोल्हापूर, १४ जुलै (वार्ता.) – गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. महापुराच्या काळात नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला. शहरातील वयोवृद्धांना रुग्णालयात भरती करणे अत्यंत अडचणीचे झाले होते. तरी यंदाही संभाव्य पूरस्थिती पहाता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. या वेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह अन्य उपस्थित होते.
महापालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवेळी नालेसफाई न झाल्यामुळे, तसेच ओढे-नाले यांवर बांधकामास अनुमती दिल्याने पूरस्थिती गंभीर बनली होती. यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यास आम्ही नागरिकांना बाहेर काढणे, अन्नपुरवठा करणे यांसह औषधे पुरवण्याचे काम विनामूल्य करू. यासाठी शिवसेनेच्या वतीने आम्ही २ बोटींची व्यवस्था केली आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !