‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !

हिंदुद्वेषाची परमावधी !

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !

झळा या लागल्या जिवा..

झळा या लागल्या जिवा..

जीवनशैली पालटण्यासाठी साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याग करण्यास कोणतीही समस्या नसते; मात्र ज्याला उपभोग घेण्यात अधिक आवड असते, त्याला अवघड जाते. जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी साधनेतून निर्माण होणारा त्याग आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अशा त्यागी जिवांचे रक्षण निसर्ग करील, यात शंका नाही; कारण हिंदु धर्मानुसार निसर्गातही देव आहे !

महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी एका वाहनात पोलिसांना एकूण ९० तलवारी सापडल्या. ही शस्त्रास्त्रे राजस्थान येथून जालन्याकडे नेण्यात येणार होती.

हिंदीला विरोध !

हिंदीला विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वाेत्तर राज्यांमधील शाळांमधील हिंदीला आवश्यक विषय बनवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आसामसहित अनेक राज्यांनी त्याला विरोध दर्शवण्यास प्रारंभ केला आहे.

भोंग्यांमागील ढोंगी !

भोंग्यांमागील ढोंगी !

इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.

आदर्श उद्योगरत्न !

आदर्श उद्योगरत्न !

८४ वर्षीय रतन टाटा यांच्यासारखा उत्साहाचा खळखळता झराच भारत देशाला लाभला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा निर्माण होणे विरळाच ! त्यांच्यासमोर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवे. देशाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवणारी रतन टाटा यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक भारतियाच्या मनात अजरामर राहील, हे निश्चित !

आंदोलनांचे उत्तर काय ?

आंदोलनांचे उत्तर काय ?

सर्वाेच्च न्यायालयाचा हा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासादायक असला, तरी जे निर्णय प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत, त्यासाठी त्यांना लढा द्यावाच लागणार आहे. अशी आंदोलने, बंद पुकारणे, निवेदने, मागण्या हे प्रशासनाचे अपयश आहे, हे वारंवार दाखवत रहाणे आणि सक्षम प्रशासनाची मागणी करणे, एवढेच सध्या जनतेच्या हातात आहे.

बहुपत्नीत्व आणि सुधारणावाद !

बहुपत्नीत्व आणि सुधारणावाद !

लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी समान नागरी कायदा हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्यामुळे या कायद्याला वेगवेगळ्या प्रकारे धर्मांध विरोध करत असतील, तर तो लवकरात लवकर अस्तित्वात येण्यासाठी हिंदूंनीही संघटित होऊन सरकारला तो आणण्यासाठी दबाव आणायला हवा.

उत्तरप्रदेश सरकारचे यश !

उत्तरप्रदेश सरकारचे यश !

आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.