दंगली आणि हतबल पोलीस !

दंगली आणि हतबल पोलीस !

धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असतांना आणि हिंदूऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना सुजात यांनी अशी विधाने करणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदूंनो, काळ कठीण आहे, यातून तरून जाण्यासाठी स्वतःला शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवा !

पुन्हा हिंदूंचे पलायन ?

पुन्हा हिंदूंचे पलायन ?

राजस्थान येथील करौली येथे गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षदिनाला हिंदूंनी दुचाकींची फेरी काढली होती. ती फेरी धर्मांधांच्या भागात आल्यावर तिच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांची जाळपोळ करण्यात आली.

एस्.टी.चे खरे मारेकरी कोण ?

एस्.टी.चे खरे मारेकरी कोण ?

सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !

सैन्यभरतीची सक्ती !

सैन्यभरतीची सक्ती !

राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !

जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

पाकिस्तानी लोकशाही !

पाकिस्तानी लोकशाही !

पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते.

श्रीलंकेतील आणीबाणी !

श्रीलंकेतील आणीबाणी !

अर्थव्यवस्था देशाबाहेरील गोष्टींवर अवलंबून असल्यास काय हाल होऊ शकतात ? हेसुद्धा श्रीलंकेच्या उदाहरणातून दिसते. चीनसारख्या धूर्त आणि कपटी देशाकडून कर्ज घेतल्यास भोगावे लागणारे दुष्परिणामही दिसतात. यातून भारताने बोध घ्यावा. एकूणच राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक धोरणे आखल्यास श्रीलंकेसारखी वाईट परिस्थिती येणार नाही, हे निश्चित !