‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे मोर्चा !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदू सहभागी झाले होते.

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला.

अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !

अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?

सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात इम्रान अलीच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. जमशेदपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हल्दीपोखर गावात गोहत्या होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान अलीच्या घरावर छापा टाकला.

धर्मावरील आघातांविरुद्ध सांगलीत १० सहस्र हिंदूंची सिंहगर्जना !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन अन् सामाजिक तेढ यांच्या विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सांगलीत २४ डिसेंबरला भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

गोवंशहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधात सकल हिंदु समाजाची ‘जनगर्जना’ !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोवंश हत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने चिंचवड स्थानक येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

तारुण्याचा उपयोग धर्माच्या कार्याकरता करावा ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे पाटील

भारत देश हा तरुणांचा आहे. कीर्तन, प्रवचन, व्याख्याने ही तरुणांकरताच असतात. तारुण्य तेच भाग्याचे जे धर्माच्या कार्याकरता वापरले जाते आणि क्रांती ही तरुण वयात करता येते.

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.