कोरोनाच्या संकटातही चीनच्या निर्यातीमध्ये २१ टक्क्यांची वाढ !

जगाला कोरोनाच्या संकटात चीनने टाकले, असे म्हटले जात असतांना चीनच्या व्यापारामध्ये होणारी वाढ त्याच्यावरील संशय वाढवते !  

पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे जनआंदोलने केली जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

चीन हवामानात पालट करून भारतात अतीवृष्टी किंवा हिमवृष्टी करण्याच्या प्रयत्नात !

चीन भारतासह अन्य शेजारी देशांना त्रास देण्यासाठी आता नवी योजना आखत आहे. चीन रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करून हवामानात पालट करण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे असा प्रयत्न असणार आहे. यामुळे शेजारी देशांमध्ये मोठे पूर आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘विविधतेला जोडणारा घटक केवळ भारताजवळच असून आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करून हिंदु राष्ट्र घोषित करा ! – राष्ट्रीय शक्ती नेपाल

नेपाळ सरकारची चीनसमर्थित धोरणे पहाता तेथील हिंदु जनतेने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीस आरंभ केला आहे. यासाठी त्यांनी दुचाकीफेरी काढून साम्यवादी पक्षाच्या के.पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विरोध केला.

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.

अन्नधान्याच्या संकटामुळे चीन अनेक वर्षांनंतर भारताकडून तांदूळ खरेदी करणार

चीनने विज्ञानामध्ये कितीही प्रगती केली, शेजारी देशांवर अतिक्रमण केले, तरी पोटाची भूक भागवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकत नाही, हे आता त्याच्या लक्षात येईल, हीच अपेक्षा ! ३ दशकांत चीनने प्रथमच भारताकडून तांदळाची आयात करण्यास प्रारंभ केला आहे.

चीनचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकचे पत्रकार कुअंर शाहिद यांनी दाखवला पाकच्या पंतप्रधानांना आरसा !

फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !