६० व्या मुक्तीदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्तीलढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन केले जाणार आहे. गोमंतकियांसाठी हा एक अभिमानाचा भाग असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.