
मुंबई – ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर खबरदार, आम्ही रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिली आहे. भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव मंत्रीमंडळात करा. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी स्वीकारला जाणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले, त्याच वेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचे कलमही आम्ही या कायद्यात घातले आहे.
‘ओबीसी महामंडळाच्या खात्यात २०० कोटी रुपये आहेत; पण राज्य सरकारने या महामंडळातील सगळ्या योजना बंद केल्या आहेत’, असा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू