
मुंबई – ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर खबरदार, आम्ही रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिली आहे. भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव मंत्रीमंडळात करा. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी स्वीकारला जाणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले, त्याच वेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचे कलमही आम्ही या कायद्यात घातले आहे.
‘ओबीसी महामंडळाच्या खात्यात २०० कोटी रुपये आहेत; पण राज्य सरकारने या महामंडळातील सगळ्या योजना बंद केल्या आहेत’, असा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !