CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले

केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य !

डावीकडून जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, सौरभ दास आणि आशुतोष रांका

नवी देहली – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासमवेत २५ जुलैला दुपारी झालेल्या तिसर्‍या बैठकीनंतर कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) त्याचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या बैठकीत सीजेपीच्या सर्व ३ मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे बैठकीनंतर जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या वेळी सौरभ दास यांनी आंदोलकांना ‘जंतरमंतरवर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांनी आता घरी परतावे’, असे आवाहन केले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राची बातमी पसरताच जंतरमंतरवर आनंद साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी एकता झिंदाबाद’, ‘जय भीम’ अशा  घोषणा दिल्या आणि राष्ट्रगीत गायले.

सरकारने मान्य केलेल्या मागण्या

अ. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र

आ. नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देणार

इ. जंतरमंतर येथील हिंसक आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांविरुद्ध नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेणार