व्यापक अधिकार देणारा नवा टपाल कायदा !
इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आणल्या, त्यातील टपाल खाते सेवा सुविधेचा उल्लेख नक्की करावा लागेल. भारतात असलेली टपाल खाते व्यवस्था किंवा यंत्रणा सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. वर्ष १७२७ मध्ये कोलकाता येथे पहिले टपाल कार्यालय चालू केल्याची नोंद आहे.