कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !

कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींनी पाहिला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट !

येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’च्या वतीने पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखवण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.

मुंबईतील वाहनांच्या संख्येवर वेळीच आवर न घातल्यास संपूर्ण शहर बंद पडेल ! – वाहतूक तज्ञ

मुंबईत गाड्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. या आठवड्यात मुंबईत ४६ लाख एवढी वाहनसंख्या झालेली आहे. प्रतिकिलोमीटर २ सहस्र ३०० गाड्या आहेत.

उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव

उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्‍यास अटक !

जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये जामीनदाराचे बनावट आधारकार्ड आणि ७/१२ चा उतारा सादर करणार्‍या योगेश सूर्यवंशी अन्य १ या २ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समान नागरी कायद्यामुळे गोव्याला शांती लाभली ! – अवधूत तिंबलो, उद्योजक

ते पुढे म्हणाले, ‘‘नागरिकांनी देशभक्तीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. भारत आता पालटत आहे आणि आता चांगले कायदे कार्यवाहीत आणले जात आहेत.’’ या कार्यक्रमाला मडगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेविषयी उदासीनता !

जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !

कराड शहरातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे भुईसपाट करण्याचे आदेश द्यावेत ! – शिवशंकर स्वामी, मानद पशूकल्याण अधिकारी

निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे डोळे त्यानेच घडवून घेतले ! – शिल्पकार अरुण योगीराज

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे.