कंत्राटी बालरोग तज्ञासह २ परिचारिका बडतर्फ, तर जिल्हा शल्यचिकित्सकासह ४ जण निलंबित ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

उशिरा जागे होणारे प्रशासन ! रुग्णालयांतील प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि शासनाचे रुग्णालयांकडे असणारे दुर्लक्ष यांमुळे अशा घटना घडतात !

कराड तालुक्यात दंड न भरलेल्यांच्या भूमी होणार सरकार जमा

अवैध वाळू, मुरुम, माती यांसह गौणखनीज उत्खनन प्रकरणी कराड तालुक्यातील दंड न भरणार्‍यांच्या भूमी सरकार जमा करण्याविषयी नोटीसा पाठवल्या, अशी माहिती कराडचे तहसीलदार यांनी दिली.

सातारा येथे प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण !

२६ जानेवारी या दिवशी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल,अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा येथील ऐतिहासिक चार भिंत परिसरात मद्यपींचा वावर !

जे सर्वसामान्य शिवभक्तांना दिसते ते पोलिसांना का दिसत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून लक्ष का देत नाहीत ?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमधील कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती आणि लस साठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहे.अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एका जाती समूहाने २८ सहस्र पेशवे सैनिकांना कापले, हा इतिहास खोटा ! – अधिवक्ता शिवाजी कोकणे 

कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एक विशिष्ट जाती समूह यांच्यात झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत.

(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू ! – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.