कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांची कारवाई

सातारा – अवैध वाळू, मुरुम, माती यांसह गौणखनीज उत्खनन प्रकरणी कराड तालुक्यातील अनेकांना दंड केला; मात्र त्यातील काहीजणांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सात-बारा नोंदीवर सरकारी बोजा चढवण्यात आला. संबंधितांनी या कारवाईकडे दुर्लक्ष करत दंड भरण्याचे टाळले. त्यामुळे प्रशासनाकडून दंड न भरणार्यांच्या भूमी सरकार जमा करण्याविषयी नोटीसा पाठवल्या. त्यानंतरही दंड न भरल्याने १ कोटी ४६ लाख ६६ सहस्र २७५ रुपयांच्या वसुलीप्रकरणी कराड तालुक्यातील २१ जणांची भूमी सरकार जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. यामुळे दंड न भरणार्यांची झोप उडाली आहे.
कराड येथील कृष्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा, साठा आणि वाहतूक करणार्यांना तहसील कार्यालयाने दंड ठोठावला होता. तालुक्यातील ८५ जणांच्या सात-बारावर ४ कोटी ५५ लाख ७ सहस्र ३६० रुपयांचा बोजा चढवला होता.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक