ऐतिहासिक ठेव्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची ‘धर्मवीर युवा मंच’ची मागणी
जे सर्वसामान्य शिवभक्तांना दिसते ते पोलिसांना का दिसत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून लक्ष का देत नाहीत ?

सातारा – सातारा शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ले अजिंक्यतारा, चार भिंत परिसरात काही विघ्नसंतोषी मंडळी चुकीचे कार्य करतांना शिवभक्तांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे सातारा शहरातील या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून मद्यपींना धडा शिकवावा, अशी मागणी ‘धर्मवीर युवा मंच’ने सातारा पोलिसांकडे केली आहे.
|
…..तर मद्यपींना वचक बसण्यासाठी हातात दांडकी घेणार ! सातारा शहर पोलिसांना दोघेजण मद्यपान करत असतांना कळवले होते; मात्र पोलीस विलंबाने घटनास्थळी पोचले. तोपर्यंत मद्यपी तेथून पसार झाले होते. शहर पोलिसांना कळवूनही ते काहीही करणार नसतील, तर यापुढे ‘ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे’ यासाठी मद्यपींना वचक बसण्यासाठी प्रसंगी हातात दांडकी घ्यावी लागतील, अशी चेतावणी ‘धर्मवीर युवा मंच’ने दिली आहे. |
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन