शैक्षणिक पदव्यांचा अहंकार नको !

प्राचीन काळी वीज, आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आदी अस्तित्वात नव्हते; मात्र तरीही केवळ उपलब्ध बांधकाम साहित्याच्या आधारे तत्कालीन कारागिरांनी सर्वोत्तम नक्षीकाम केले. सहस्रो वर्षांपूर्वी बांधलेल्या मंदिरांच्या माध्यमातून ते पहाता येते.

नक्षलवादाचे पाठीराखे !

केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.

युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व

भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्‍या महायुद्धात वापरले गेले होते.

महानगरपालिका शाळांमधील गळती ?

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; पण तेथील शाळांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत चालली आहे, हे दुर्दैवी आहे. परभणी महापालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या केवळ २ शाळाच शेष आहेत.

‘कृषी सन्मान’चा अपमान !

भारत हा शेतीप्रधान देश असून देशात शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून ध्येय-धोरणे ठरवली जातात. भाजपचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी शेतकर्‍यांच्या हिताच्या अनेकविध योजना राबवल्या.

गो उपचार !

नेदरलँडमध्ये (हॉलंडमध्ये) गो उपचार ही नवीन पद्धत रूढ होत आहे. यानुसार गायीला मिठी मारणे, तिला स्पर्श करणे, तिला कुरवाळणे असे प्रकार केले जातात. गायींच्या सहवासात घालवलेला थोडासा वेळ हा संबंधितांना लाभदायक ठरत आहे.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !

महानगरे आणि मोठी शहरे येथे रहाणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !