आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्चित आहे ! – पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोग
आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेतीशिवाय काहीही शिल्लक रहाण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्चित आहे. पृथ्वीवरचे तापमान आणि हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.