सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.

न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी सलमान खान याने क्षमा मागितली

असे खोटे बोलणारे आरोपी आणि अविश्‍वासार्ह अभिनेते म्हणे तरुण पिढीचे आदर्श !

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड  !

गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वीजदेयक माफीसाठी पुण्यात ‘बोंबाबोंब’ आंदोलन !

महावितरण आस्थापनाने वीजजोडणी तोडण्यासाठी दिलेल्या ७१ लाख नोटीसा रहित करण्यात याव्यात, घरगुती आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे संपूर्ण वीजदेयक माफ करावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अमरावती जिल्ह्यातील २४ गावांत वीजच नाही ! – खासदार नवनीत राणा

संसदेचे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की, केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी ‘विशेष योजना’ आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत..

देहलीतील हिंसाचारामागे योगेंद्र यादव ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांचा आरोप

बिट्टू यांनी म्हटले की, जर योगेंद्र यादव यांना अटक केली गेली, तर शेतकरी आणि सरकार यांच्यामधील चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकते; कारण यादव हेच या दोघांमध्ये आग लावणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

समाजमाध्यमांवर केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणार्‍यांचीसुद्धा चौकशी करणार का ? – आमदार राम कदम यांची पत्राद्वारे विचारणा

‘सोनम कपूर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, अली फजल यांसह अनेक कलाकारांच्या ट्वीटमध्येही अनेक शब्द आणि ‘हॅशटॅग’ एकसारखेच आहेत. तुम्ही या कलाकारांच्या ट्वीटचीही चौकशी करणार का ?’, असा प्रश्‍न कदम यांनी विचारला आहे.

सांगली शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन हा ‘समर्पणदिन’ म्हणून साजरा !

११ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत समर्पण पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाच्या निमिताने भाजप पदाधिकारी यांनी समर्पण निधी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.

राष्ट्रसेवा दल १० लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या राष्ट्रपतींना पाठवणार !

देशातील शेतकर्‍यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

भारतातील मिझोराममध्येही भूकंपाचा झटका जाणवला. चंपाई येथे ३.१ रिक्टर स्केल भूकंपाचा झटका जाणवला.