पालघर येथे ११ मुलांना विषबाधा, मुलांची प्रकृती स्थिर

पालघर येथील किरत गावात एका लग्नासाठी आलेल्या ५ ते १२ वयोगटातील मुलांना विषबाधा झाली. जेवल्यानंतर या मुलांना उलटी आणि मळमळ होण्यास आरंभ झाला.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करावे ! – खासदार उदयनराजे भोसले

प्रशासकीय मान्यता मिळालेला कराड-चिपळूण रेल्वेमार्ग लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविषयी मुंबई महापालिकेत निनावी पत्र

कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासाचे ‘चित्रकूट’ हे नाव पालटून ‘लंका’ ठेवावे !

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

सातारा पालिका प्रशासन मढ्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे ! – नगरसेवक अण्णा लेवे

कोरोना आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली नगरपालिकेने मनाला वाटेल तसे साहित्य खरेदी केले आहे. ५०० मास्क खरेदीचे वाटप झालेच नाही. कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटले आहेत.

सातारा येथे जिल्हा सत्र न्यायालयाजवळील पालापाचोळ्यास आग

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय मार्गावरील ओढ्याजवळ झाडांचा पालापाचोळा साचला होता. त्याला ३ फेब्रुवारीला रात्री १० वाजता अचानक आग लागली.

‘हा निवळ अपर्कीतीचा हेतू, काही तथ्य नाही !’ – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचे प्रकरण

अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस उपायुक्तांची न्यायालयात धाव

अर्णव गोस्वामी यांनी माझी आणि मुंबई पोलीस दलाची हेतूपूर्वक अपकीर्ती केली आहे, असे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

गिरगाव चौपाटी परिसरातील वडाचे झाड तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी 

गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या रुग्णावर उपचाराचे निर्बंध शिथिल करण्यासाठी खासगी रुग्णालयांची याचिका

कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.