धारवाड (कर्नाटक) येथील भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षाची निर्घृण हत्या !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना त्याच्याच पदाधिकार्‍याची अशी हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हत्या करणार्‍यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेकडून पाण्याची चोरी रोखण्यासाठी फिरत्या पथकाची नियुक्ती

पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीची चोरी होते, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचे परिणाम ! समाजाला धर्मशिक्षण दिले, तर त्यांच्यात आपसूकच नैतिकता निर्माण होते, हे लक्षात घेऊन शासनाचे लोकांना धर्मशिक्षण द्यावे !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याच्या नोटिशीवरून गावात तणावाचे वातावरण

नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची एक प्रत सामाजिक माध्यमातून फिरू लागली. मंदिर पाडले जाऊ नये, यासाठी भक्तगण, तसेच राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत.

गोव्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगींमुळे पावसात पूर येण्याची शक्यता ! – तज्ञांचे मत

पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !

म्हादई प्राधिकरण गोव्याचे हित पहाण्याची शक्यता अल्प ! – जलस्रोत खात्याचे माजी प्रमुख अभियंता नाडकर्णी

कर्नाटक म्हादईचे गोव्यात येणारे सर्व पाणी वळवण्याच्या सिद्धतेत ! म्हादईच्या संरक्षणासाठी गोव्यात राजकीय पाठबळ नाही, तर याउलट कर्नाटकमध्ये म्हादईचे पाणी वळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. गोव्यात असे का होत नाही ?

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन ही केले.

मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी पैशांची मागणी करत असल्‍याचा आरोप !

जनतेच्‍या आरोग्‍याशी संबंधित या गंभीर प्रकाराचे सरकारने सखोल अन्‍वेषण करावे !

नवी मुंबईत पावसाळापूर्व गटार स्‍वच्‍छतेचे काम ६५ टक्‍के पूर्ण !

नवी मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रातील पावसाळापूर्व गटारातील गाळ काढणे हे काम ६५ टक्‍के झाले असल्‍याची माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

सातारा जिल्‍ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यामुळे धोका वाढला असून आरोग्‍य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील अन्‍य भाषिक, तसेच केंद्रीय शाळांमध्‍ये होणार मराठीचे मूल्‍यांकन !

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षे वरील शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्‍या इयत्तांमधील विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन केले जाणार आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा कितपत आकलन होत आहे, याचा अभ्‍यास करता येणार आहे.