कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत असतांनाही युरोप आणि अमेरिका येथील जनता करत होती मौजमजा !

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट…

चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या अचानक २ कोटींनी घटली

चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्‍या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.

देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ

देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे.

देशभरात अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घाला ! – ‘निर्भया’च्या अधिवक्त्या सीमा समृद्धी कुशवाह यांची मागणी

या मागणीचा विचार करून प्रशासनाने अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालावी, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !

विवाहबाह्य संबंधांसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यात भारतियांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले !

पाश्‍चात्त्य विकृतीचा आणखी एक दुष्परिणाम ! आज विदेशात कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पाश्‍चात्त्य विकृतीचा दुष्परिणाम जाणून सरकार आणि प्रशासन यांनी अशा ‘अ‍ॅप’वर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी !

देशभरात कोरोनाचे ५८८ रुग्ण, एकूण ११ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६२ झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तमिळनाडू आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याचसमवेत देशाच्या वेगवेगळया भागातील कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून…

कोरोनामुळे जगभरात १९ सहस ६०७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १९ सहस्र ६०७ झाली आहे. एकूण १७५ देशांत ४ लाख ३४ सहस्र ९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. असे असले, तरी कोरोनाची लागण झालेले १ लाख ११ सहस्र ८७०…