राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची मागणी
नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने बांगलादेशातील हिंदूंवरील छळाविरुद्ध एक ठराव संमत केला आहे आणि बांगलादेशातील हिंदूंसाठी एकता दाखवण्याचे आवाहन केले आहे. या सूत्रावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
🚨 RSS Demands UN Intervention on Atrocities Against Hindus in Bangladesh!
🔹 RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha calls on the @UN to take action against the persecution of Hindus in Bangladesh!
🔹 Not just in Bangladesh—wherever Hindus face oppression, India & Hindu… pic.twitter.com/9RDObA5HoG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2025
प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे की,
१. बांगलादेशामध्ये हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, ज्यावर प्रतिनिधी सभा चिंता व्यक्त करते. बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या वर्ष १९५१ मध्ये २२ टक्के होती, ती आता ७ टक्क्यांवर आली आहे.
२. बांगलादेशातील सध्याच्या सत्तापालटाच्या काळात मठ, मंदिरे, दुर्गापूजा मंडप आणि शैक्षणिक संस्था यांवर आक्रमणे झाली. मूर्तींची विटंबना, हत्या, मालमत्तेची लूट, महिलांचे अपहरण आणि छळ, बलात्कार, बळजोरीने धर्मांतर अशा अनेक घटना सतत समोर येत आहेत. या घटनांना केवळ ‘राजकीय’ म्हणणे आणि त्यांचे धार्मिक पैलू नाकारणे, हे सत्यापासून दूर जाण्यासारखे होईल; कारण बहुतेक बळी हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदायातील हेच आहेत.
३. काही आंतरराष्ट्रीय शक्ती जाणूनबुजून भारताच्या शेजारील प्रदेशांमध्ये एका देशाला दुसर्या देशाविरुद्ध उभे करून आणि अविश्वास अन् संघर्ष यांचे वातावरण निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
४. बांगलादेशातील हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदाय यांच्यावर होणार्या अमानुष अत्याचारांची संयुक्त राष्ट्रे अन् जागतिक समुदायासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना यांनी गंभीर नोंद घ्यावी अन् या हिंसक कारवाया थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा.
संपादकीय भूमिका
|