

आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता ।
सर्व साधक-साधिकांचे मन आनंदी झाले आता ।
घालूनी दारी रांगोळ्या सज्ज होती स्वागत करण्या ॥ १ ॥
हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग ।
करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥ २ ॥
अष्टांग साधनेचे (टीप) महत्त्व जाणून पंचांग सेवेस सिद्ध होऊया ।
अन् सुयोग्य नियोजनाद्वारे परिपूर्ण सेवा करूया ।
गुरुचरणांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून गुरुकृपेस पात्र होऊया ॥ ३ ॥
‘पंचांग म्हणजे गुरुधन’ ऐसा भाव मनी जागवूया ।
वेळेत हिशोब पूर्ण करून गुरुधनाची हानी टाळूया ॥ ४ ॥
‘कोरोना महामारी’मध्ये शासनाचे नियम तंतोतंत पाळूया ।
सेवेतील चुका टाळून सद्गुणांची जोपासना करूया ॥ ५ ॥
हे पंचांगदेवते, करूनी तव चरणी साष्टांग नमन ।
माझ्या मनोगतास देतो कृतज्ञताभावे गुरुचरणी पूर्णविराम ॥ ६ ॥
टीप – अष्टांग साधनेतील कृती : १. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, २. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ७. सत्साठी त्याग आणि ८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)
– गुरुचरणसेवक,
श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, कोल्हापूर. (२०.७.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !