अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी
भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.