असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्‍या महिलेची माघार

राष्ट्रवादीचे नेते आणि  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या.

हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संमत

मेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव प्रतिनिधीगृहात चर्चेनंतर संमत करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ विरुद्ध २३२ मतांनी संमत झाला.

(म्हणे) ‘नथुराम गोडसे देशातील पहिला आतंकवादी आहे ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

कुणाला आतंकवादी म्हणावे, हेही न कळलेले काँग्रेसी ! जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला आदराने ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांनी असे विधान करण्यात नवल ते काय ?

तुर्कस्तानमधील १ सहस्र प्रेयसी असणार्‍या मुसलमान धर्मगुरूला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी १ सहस्र ७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

ख्रिस्त्यांच्या वासनांध पाद्रयांच्याही कितीतरी पाऊल पुढे असलेले धर्मांध धर्मगुरु ! हिंदूं संतांची नाहक अपकीर्ती करणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

(म्हणे) ‘भारताकडून कालापानी, लिपुलेख आदी भाग परत घेणार !  

ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

नव्या धोरणानुसार आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

राज्य सरकारने राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पालट केला असतांनाच काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ, तर काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.