(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांचे देशद्रोही विधान !

  • अशांच्या विरोधात ममता बॅनर्जी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवणार नाहीत; कारण त्या धर्मनिरपेक्ष आहेत आणि त्याचा अर्थ धर्मांधांनी कितीही देशविरोधी कारवाया, विधाने केली, तरी त्यांना पाठीशी घालणे हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे !
  • केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा. तसेच ‘देशातील किती अल्पसंख्यांकांना असे वाटते’ याचाही आता शोध घेण्याची वेळ आली आहे !

कोलकाता (बंगाल) – जर भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, तर भारतात ४ नवीन पाकिस्तान बनवले जाऊ शकतात, असे विधान तृणमूल काँग्रेसचे धर्मांध नेते शेख आलम यांनी राज्यातील बीरभूम जिल्ह्यातील नानूर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराचा प्रसार करतांना केले.

१. आलम यांच्या विधानावर भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीट करून विचारले आहे की, ममता बॅनर्जी आलम यांच्या या विधानाचे समर्थन करतात का ? लोकांना असा बंगाल हवा आहे का ?

२. वर्ष २०१६ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम यांनी एका पत्रकाराशी बोलतांना म्हटले होते, ‘मी तुम्हाला कोलकात्यातील ‘मिनी पाकिस्तान’मध्ये घेऊ जातो.’ ते कोलकात्यातील गार्डन रीच भागाविषयी बोलत होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली होती.