सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा आणि त्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी.

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !

सनातनद्वेष्‍ट्यांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

राज्‍यघटनेने दिलेल्‍या अधिकारांचा वापर करून धर्मावरील आघातांना ठामपणे विरोध करणे, हे प्रत्‍येक नागरिकाचे कर्तव्‍य आहे. तसेच या प्रकरणात मद्रास उच्‍च न्‍यायालयाने धर्मद्रोही सत्ताधार्‍यांना दिलेल्‍या कानपिचक्‍या योग्‍यच आहे. सनातनद्वेष करणार्‍यांना ही चपराक पुरेशी आहे, असे वाटते.

सनातन हिंदु धर्माच्‍या विरोधात द्वेषमूलक वक्‍तव्‍ये !

न्‍यायव्‍यवस्‍था, पत्रकारिता अथवा लोकप्रतिनिधी आपल्‍याला साहाय्‍य करतील, या भ्रमात हिंदूंनी राहू नये. हे सर्व घटनात्‍मक स्‍तंभ केवळ आणि केवळ धर्मांध, नास्‍तिक अन् हिंदुद्वेष्‍टे यांची बाजू घेण्‍यासाठी आहेत, असे हिंदूंना वाटल्‍यास चुकीचे ठरणार नाही.

(म्हणे) ‘मंदिरात माझ्यासमवेत जातीभेद करण्यात आला !’ – के. राधाकृष्णन्, मंदिर व्यवहारमंत्री, केरळ

के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा  !

आज या आघाडीने उघडपणे बोलणे चालू केले आहे. उद्या ही लोकं आपल्यावर आक्रमणे अजून वाढवणार आहेत. देशातील कानाकोपर्‍यांमध्ये असणार्‍या प्रत्येक सनातनीने आणि या देशावर प्रेम करणार्‍यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्माविरुद्ध पुढील २०० वर्षे बोलत राहू !’ – उदयनिधी स्टॅलिन

सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !

गदर २, द कश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता निराशाजनक ! – अभिनेते नसीरुद्दीन शाह

अशांच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !