‘द केरल स्टोरी’ चित्रपट ‘इस्लामिक स्टेट’वर आहे, याला विरोध करणारे आतंकवादी आहेत ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामिक स्टेटविना कुणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही, असे देशातील सर्वांत उत्तरदायी संस्था असणारे उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्याचे म्हणणे बरोबर आहे. इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आहे.

‘लव्‍ह जिहाद’ चे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट आज प्रदर्शित होणार !

केरळमधील लव्‍ह जिहादचे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी भारतातील सर्व राज्‍यांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्‍च न्‍यायालयात या चित्रपटाच्‍या विरोधात याचिकाही प्रविष्‍ट करण्‍यात आली होती.

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे

प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही ! – शरद पवार

जो निर्णय मी घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी आहे. तरीही यावर पुनर्विचार करून मी दोन दिवसानंतर निर्णय घेईन.

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालू आहेत. या दृष्टीने दुर्गम भागांतील ज्या शाळांमध्ये ‘नेटवर्क’ नाही, अशा शाळांची शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे.

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश दिला.

एस्.टी.चे रूप पालटण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एस्.टी. ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एस्.टी.ने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी. एस्.टी.चे रूप पालटण्याचा राज्यशासनाने संकल्प सोडला आहे.

शरद पवार यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाचे एकाएकी त्यागपत्र !

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी पदाचे त्यागपत्र मागे  घेण्याची गळ घातली , अजित पवार यांनी मात्र भावनात्मक न होता शरद पवार यांच्या त्यागपत्राच्या भूमिकेचे समर्थन केले.

मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

मानखुर्द (मुंबई) येथे शेजारी रहाणार्‍या सराईत गुंडाने महिलेला गोळी घालून मारले !

मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्‍यांच्‍या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला आणि त्‍यात तिचा मृत्‍यू झाला.