अतीवेगातील ७ सहस्र वाहनांकडून दंड वसूल

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती आणि राष्ट्रीय महामार्गावर एकूण ४० सहस्र ९०९ वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई केली. ७ सहस्र वाहनांवर अतीवेगाने वाहन चालवल्याविषयी दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे कारवाई वाढत असतांना अपघातांत नाममात्र घट झाली.
मुंबई-पुणे दरम्यान दोन्ही महामार्गांवर १ डिसेंबरपासून सुरक्षा मोहीम चालू आहे. १ डिसेंबर २०२२ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई करत ७ कोटी २२ लाख ७९ सहस्रांचा दंड वसूल केला आहे. महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ मासांत एकूण ६ सहस्र ९८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकाआतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक