ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना मुंबई मेट्रोत २५ टक्के सवलत !

१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे.

मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा

या चित्रपटाला विरोध करणारे जिहादी आतंकवाद्यांचे समर्थक असून केंद्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता !

अभिनेत्री जिया खान मृत्‍यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली आहे. विशेष सीबीआय न्‍यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्‍हान देण्‍याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.

बारसू येथील प्रकल्पाला ७०  टक्क्यांहून अधिक लोकांचे समर्थन ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आंदोलन करणारे काही लोक स्थानिक, तर काही बाहेरचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी बळजोरी केली जाणार नाही. प्रकल्पामुळे नागरिकांना रोजगार मिळेल.

पावसाळ्यापूर्वीच परशुराम घाटातील महामार्गाचे काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील ५ घंटे वाहसुकीस बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून तो बुजवण्याचे काम चालू करण्यात आले आहे.

देशात जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला !

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

कोंढवा (पुणे) येथील शाळेत आतंकवादी प्रशिक्षण चालू असल्याचे पोलिसांना आधी का लक्षात आले नाही ? – डॉ. रिंकू वढेरा, लेखिका आणि इतिहास तज्ञ

प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा.