व्यापारी, नागरिक यांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिकांचा ताबा मिळण्यासाठी अपंगांचे पी.एम्.आर्.डी.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन !

असे आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून समस्या का सोडवत नाही ?

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा !

येत्या ८ दिवसात संबंधित ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री आणि गाढवे यांच्यावर  कारवाई न केल्यास संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांमध्ये मोकाट कुत्री अन् गाढवे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी – पत्रकार परिषदेतील मागणी

‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा !

या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्‍या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी.

‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ परिसरात फादरकडून होणार्‍या अवैध कृत्यांविषयी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जोसेफ वाझ यांच्याकडून या वारसास्थळाच्या संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर फादर हे स्थान चर्चच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.

गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यशासनाकडून मान्य !

पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी स्वत: आझाद मैदानात येऊन गड-दुर्ग रक्षण समितीच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी समयमर्यादा निश्‍चित करून राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे जतन आणि सवंर्धन यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन श्री. मंगलप्रभात लोढा यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकर्‍यांची फसवणूक ! वर्ष १९७५ मध्ये अ‍ॅल्युमिनिअम (BALCO) प्रकल्पासाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकर्‍यांची १२०० एकर भूमी संपादित करण्यात आली; मात्र त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी आस्थापनांना देण्यात आल्या.