सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा !

सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हुपरी येथील मुख्याधिकारी आणि पोलिसांच्या गोपनीय विभागाचे अधिकारी यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले.

आशा प्रवर्तकांचे प्रश्‍न न सुटल्यास आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अनेक ठिकाणी प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक काम करतात, तसेच त्या सुट्टीच्या दिवशीही काम करतात. इतके काम करूनही त्यांना त्याचा पुरेसा मोबदला देण्यात येत नाही.

नियोजन, समन्वयाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीची समस्या जटील, तर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते.

दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

कोरोना महामारीमुळे आलेला आपत्काळ आणि दळणवळण बंदीच्या काळात सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. अशा वेळी सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले…..

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.

विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, समन्वयक, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

गडावरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत…

राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !

लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.

कोल्हापूर महापालिकेचा ६२३ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प संमत

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संवर्धन यांसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने निदर्शने

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.