राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा !

कोल्हापूर – राज्यात ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असून कोल्हापूर जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह १६ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये सरासरी ५० पिशव्या रक्तदान होते. लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने सध्या हे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनीही लस घेण्यास प्रारंभ केल्याने रक्ताचा पुरवठा आणखी अल्प होण्याची दाट शक्यता आहे.