गोव्यात होणार्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ११० प्रतिनिधी सहभागी होणार !
भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याला पर्याय नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.