निर्दाेष मुक्तता करतांना १२ वर्षे अपकीर्ती करणार्यांना १२ वर्षे कारागृहात टाका आणि त्यांच्याकडून मानहानीचा दंडही घेऊन निरपराध्यांना द्या !
मिरज शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता. हा खटला विसर्जित करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २ मासांपूर्वी न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते.