सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. हवामान खात्याने आजही येलो अलर्टची, तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची चेतावणी दिली आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे आज शैक्षणिक सुट्टी

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, सखल भागात पाणी साचणे, रस्त्याच्या बाजूची माती खचणे, पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने गटारात जाणे, झाडांची पडझड होणे, घरांच्या भिंती पडणे आदी घटना घडल्या आहेत. सलग आठव्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत !

युक्रेनमध्ये युद्धातील आक्रमणात फोडण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झाली पूरस्थिती !

३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !

मान्‍सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा झाल्‍यास आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

मान्‍सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्‍यात आली, त्‍या वेळी ते बोलत होते.

गोव्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगींमुळे पावसात पूर येण्याची शक्यता ! – तज्ञांचे मत

पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !

भविष्यात जगात भेडसवणार्‍या तीव्र पाणीटंचाईचा भारताला फटका बसणार !

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  
गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांची पाण्याची पातळी घटणार !

वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी ५० हून अधिक वर्षांचा कालावधी लागेल ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर

गोव्यात ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या ! म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली.

सिंधुदुर्ग : कुडाळ रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आणि पूल यांची उंची वाढवण्यासाठी ३ कोटी निधी संमत

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अर्थसंकल्पात यासाठी ३ कोटी रुपये निधी संमत झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.