
ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शहरातील वालधुनी काठ परिसरातील १ सहस्र कुटुंबांचे २७ जुलैच्या रात्री संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरित नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

अनेक वर्षे मागणी करूनही वालधुनी नदीपात्रातील गाळ काढला जात नाही ! – आमदार गणपत गायकवाड, भाजप
वालधुनी नदी गाळाने भरली आहे. नदीमधील गाळ बाहेर काढणे आवश्यक आहे. अनेक वर्षे मागणी करूनही गाळ काढला जात नाही. नाले, गटार स्वच्छतेची कामे पालिकेकडून योग्य रितीने होत नाहीत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री