
ठाणे, २९ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शहरातील वालधुनी काठ परिसरातील १ सहस्र कुटुंबांचे २७ जुलैच्या रात्री संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरित नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

अनेक वर्षे मागणी करूनही वालधुनी नदीपात्रातील गाळ काढला जात नाही ! – आमदार गणपत गायकवाड, भाजप
वालधुनी नदी गाळाने भरली आहे. नदीमधील गाळ बाहेर काढणे आवश्यक आहे. अनेक वर्षे मागणी करूनही गाळ काढला जात नाही. नाले, गटार स्वच्छतेची कामे पालिकेकडून योग्य रितीने होत नाहीत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !