गावकारभार्यांसमोरील आव्हाने !
निवडून आलेले सर्वच जण वाईट असतात, असे नाही; परंतु अशा चांगल्यांची संख्या अगदी नगण्य आहे. इथे उल्लेखलेल्या विषचक्रातून गावाला बाहेर काढण्यासाठी त्यांची शक्ती अपुरी पडते. अशा चांगल्यांच्या पाठीमागे सर्वसामान्यांनी आता ठामपणे उभे राहिले पाहिजे, तरच गावे आणि खेडी खर्या अर्थाने समृद्ध बनतील !